My Childhood Essay In Marathi/माझे बालपण
४. माझे बालपण
[मुद्दे : वाट्याला आलेले बालपण- खेडेगाव - गरिबी - प्राप्त परिस्थितीत आनंद-अनेक गोष्टी स्वावलंबनाने शिकता आल्या - मोकळे वातावरण- स्वावलंबन,जिद्द- त्यातून उज्ज्वल भवितव्य.]
दहावीचे वर्ष संपत आले, तसे जो तो मला ऐकवू लागला, तू आता मोठा झालास !"बालपणाच्या तेव्हाच माझ्या लक्षात आले की, आपले बालपण आता आणि एकेक सपल आठवणी मनात जाग्या होऊ लागल्या.
माझे बालपण हे एका खेडेगावात गेले. माझा गाव निसर्गसौंदर्याने बहरलेला होता.आमच्या गावातील हवामान आणि पाणी स्वच्छ असल्याने अनेक लोक हवापालट करायला येत. बाकी उद्योगधंदे वगैरे काहीही नव्हते. गावात आमची शेती नव्हती. एका विदेशी
चित्रकाराचे मदतनीस म्हणून माझे बाबा काम करत. आई नेहमीच आजारी असायची.म्हणूनच या गावात कायम राहण्याचा बाबांना विचार केला असावा.
तो परदेशी कलावंत ज्या बंगल्यात राहत होता. त्याच्या आवारातील एका खोलीत आम्ही चौघेजण राहत होतो. बाबांचा संपूर्ण दिवस त्या परदेशी पाहुण्याची कामे करण्यात जात असे. आई बयाच वेळा अंथरुणात असे. त्यामुळे लाड, मौज, मजा हे आम्हांला
मला व माझ्या भावाला- माहीतच नव्हते.
एका मोफत चालणार्या शाळेत आम्ही जात असू व बाकीचा वेळ गावात हुंदडत असू. त्यामुळे झाडावर चढणे, नदीत पोहणे, रानावनात भटकणे या अशा अनेक गोष्टी मला येऊ लागल्या. आणखी दोन गोष्टी मला त्या वयात न मागता मिळाल्या. इंग्रजी भाषेच अभ्यास आणि उत्तम चित्रकला. त्या बाबतीत त्या विदेशी पाहुण्याने माझ्यावर खूप
उपकार केले. हेच माझ्या बालपणातील सुखाचे क्षण ! प्रतिकूल परिस्थितीमुळे मी स्वावलंबी झालो आणि हवे ते मिळवण्याची, त्यासाठी कष्ट करण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली. म्हणूनच मी म्हणतो, माझे बालपण रम्य नसले, तरी आनंददायक होते.
त्यानेच मला माझ्या उज्ज्वल भवितव्याकडे नेले.
[मुद्दे : वाट्याला आलेले बालपण- खेडेगाव - गरिबी - प्राप्त परिस्थितीत आनंद-अनेक गोष्टी स्वावलंबनाने शिकता आल्या - मोकळे वातावरण- स्वावलंबन,जिद्द- त्यातून उज्ज्वल भवितव्य.]
दहावीचे वर्ष संपत आले, तसे जो तो मला ऐकवू लागला, तू आता मोठा झालास !"बालपणाच्या तेव्हाच माझ्या लक्षात आले की, आपले बालपण आता आणि एकेक सपल आठवणी मनात जाग्या होऊ लागल्या.
माझे बालपण हे एका खेडेगावात गेले. माझा गाव निसर्गसौंदर्याने बहरलेला होता.आमच्या गावातील हवामान आणि पाणी स्वच्छ असल्याने अनेक लोक हवापालट करायला येत. बाकी उद्योगधंदे वगैरे काहीही नव्हते. गावात आमची शेती नव्हती. एका विदेशी
चित्रकाराचे मदतनीस म्हणून माझे बाबा काम करत. आई नेहमीच आजारी असायची.म्हणूनच या गावात कायम राहण्याचा बाबांना विचार केला असावा.
तो परदेशी कलावंत ज्या बंगल्यात राहत होता. त्याच्या आवारातील एका खोलीत आम्ही चौघेजण राहत होतो. बाबांचा संपूर्ण दिवस त्या परदेशी पाहुण्याची कामे करण्यात जात असे. आई बयाच वेळा अंथरुणात असे. त्यामुळे लाड, मौज, मजा हे आम्हांला
मला व माझ्या भावाला- माहीतच नव्हते.
एका मोफत चालणार्या शाळेत आम्ही जात असू व बाकीचा वेळ गावात हुंदडत असू. त्यामुळे झाडावर चढणे, नदीत पोहणे, रानावनात भटकणे या अशा अनेक गोष्टी मला येऊ लागल्या. आणखी दोन गोष्टी मला त्या वयात न मागता मिळाल्या. इंग्रजी भाषेच अभ्यास आणि उत्तम चित्रकला. त्या बाबतीत त्या विदेशी पाहुण्याने माझ्यावर खूप
उपकार केले. हेच माझ्या बालपणातील सुखाचे क्षण ! प्रतिकूल परिस्थितीमुळे मी स्वावलंबी झालो आणि हवे ते मिळवण्याची, त्यासाठी कष्ट करण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली. म्हणूनच मी म्हणतो, माझे बालपण रम्य नसले, तरी आनंददायक होते.
त्यानेच मला माझ्या उज्ज्वल भवितव्याकडे नेले.
[ शब्दार्थ :
1)मदतनीस -assistant.सहायक।
2)अंथरुणात असे-used to be bedridden.बिस्तर पर पड़ी रहना। 3)प्रतिकूल- unfavourable, adverse.विपरीत।
4)स्वावलंबी - self-reliant.अपने बलपर काम करने वाला।
5)उज्ज्वल-bright.उज्ज्वल।
6)भवितव्य- future.भविष्य।]
My Childhood Essay In Marathi/माझे बालपण
Reviewed by Shivam
on
June 07, 2018
Rating:
No comments